आतून उमलते काही, घुसमटते, पण प्रसवेना
छळतात जिवाला कधिच्या, सृजनाच्या फसव्या वेणा
गर्भात अंकुरे तेव्हा आभाळनिळाई झरली
रंध्रांतुन फुटल्या लाटा, गात्रांतुन वीज लहरली
हासले, उमलले, फुलले, आतल्या आत मोहरले
अन् तिथेच गुंतुन गेले, त्या काळोखाला भुलले
गुंत्यात जीव गुंतावा, इतके गुंतावे का रे?
विझतील अंतरामधले अस्फुट, अव्यक्त धुमारे
आतल्या आत हुंकारे, "मज व्यक्त व्हायचे आहे,
कुणि कवाड उघडुन द्या रे, मज मुक्त व्हायचे आहे!"
भेदून कवच डोकावे, चांदणी जशी उमलावी,
आभाळ मोकळे व्हावे, की नीरगाठ उकलावी
जरि धूसरसे, अधुरेसे, पूर्णत्वाने प्रकटेना,
मन हलके, तृप्त, निवांत अन् धन्य, सार्थ त्या वेणा!
या क्रान्तिच्या कविता आणि फक्त कविता, अग्निसखा [फिनिक्स] प्रमाणे खरोखरच स्वत:च्या राखेतून जन्मलेल्या.ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी ती जगते!

Wednesday, October 27, 2010
Wednesday, October 20, 2010
थांबावे का?
थेंब थेंब डोळ्यांत साठते,
सुख जन्माचे उरी दाटते,
या घटकेला असे वाटते,
इथेच सगळे संपावे का?
जे लाभे ते भाग्य भोगले,
ते केले, जे कधि न योजले,
किति मैलांचे दगड मोजले,
या वळणावर थांबावे का?
किती ग्रीष्म, किति शिशिर पेलले,
वर्षाघन रंध्रांत झेलले
शारदचांदणभूल खेळले,
इतके येथे गुंतावे का?
फुलासारखे भार वाहिले,
वास्तवातही स्वप्न पाहिले,
अजून किति मुक्काम राहिले?
नकोच आता, थांबावे का?
सुख जन्माचे उरी दाटते,
या घटकेला असे वाटते,
इथेच सगळे संपावे का?
जे लाभे ते भाग्य भोगले,
ते केले, जे कधि न योजले,
किति मैलांचे दगड मोजले,
या वळणावर थांबावे का?
किती ग्रीष्म, किति शिशिर पेलले,
वर्षाघन रंध्रांत झेलले
शारदचांदणभूल खेळले,
इतके येथे गुंतावे का?
फुलासारखे भार वाहिले,
वास्तवातही स्वप्न पाहिले,
अजून किति मुक्काम राहिले?
नकोच आता, थांबावे का?
Sunday, October 10, 2010
जोगवा
दे मला सत्वगुणाचा जोगवा जगदंबे माउली
गांजती त्रिविध ताप, संताप, व्याप, तू होई साउली ॥
घेउनी कायेची परडी, तुझ्या मी आले ग दारी
चेतवी पोत मनाचा, आई अंबे सत्वर उद्धारी
दीन ही लेक तुझी विनवी येई करुणेच्या पाउली ॥
त्यागुनी तुझी पायरी, सांग कशी जाऊ मी माघारी,
दाह हा तनामनाचा सोसेना, विटले या संसारी
तुझ्या चरणांचे अमृत दे माते, थांबव ही काहिली ॥
नांदती गर्वासुर, दंभासुर, नगरी मलीन ही झाली
मातले षड्रिपु, फिरती अस्त्रे-शस्त्रे परजित भवताली
चंडिका माय भवानी दुष्टांच्या संहारा धावली ॥
तुझी मंगलमय मूर्ती सदैव नांदो माझ्या अंतरी
ज्योत आशिर्वादाची अखंड तेवत राहो मंदिरी
ब्रम्ह तू, माया तू, शक्ती-दुर्गा तू, सकळां पावली ॥
गांजती त्रिविध ताप, संताप, व्याप, तू होई साउली ॥
घेउनी कायेची परडी, तुझ्या मी आले ग दारी
चेतवी पोत मनाचा, आई अंबे सत्वर उद्धारी
दीन ही लेक तुझी विनवी येई करुणेच्या पाउली ॥
त्यागुनी तुझी पायरी, सांग कशी जाऊ मी माघारी,
दाह हा तनामनाचा सोसेना, विटले या संसारी
तुझ्या चरणांचे अमृत दे माते, थांबव ही काहिली ॥
नांदती गर्वासुर, दंभासुर, नगरी मलीन ही झाली
मातले षड्रिपु, फिरती अस्त्रे-शस्त्रे परजित भवताली
चंडिका माय भवानी दुष्टांच्या संहारा धावली ॥
तुझी मंगलमय मूर्ती सदैव नांदो माझ्या अंतरी
ज्योत आशिर्वादाची अखंड तेवत राहो मंदिरी
ब्रम्ह तू, माया तू, शक्ती-दुर्गा तू, सकळां पावली ॥
Friday, October 8, 2010
वाढती का अंतरे?
शून्य, भाकड प्रश्न माझा, व्यर्थ त्याची उत्तरे
साधण्या जवळीक जाता, वाढती का अंतरे?
काल वैराची सुपारी, आज मैत्रीचे हसू,
वागणे या जीवनाचे कोणते मानू खरे?
कोण तो? त्याच्या नि माझ्या वेगळ्या होत्या दिशा,
पाडली त्याच्या स्मृतींनी काळजाला का घरे?
मूळ आवृत्ती जशी होती तशी, कोरी, नवी!
वाचता आली कुणाला गूढ त्याची अक्षरे?
लाकडे ओली असो की चंदनी राहो चिता,
शेवटी या चौथर्यावर फक्त उरते राख रे!
साधण्या जवळीक जाता, वाढती का अंतरे?
काल वैराची सुपारी, आज मैत्रीचे हसू,
वागणे या जीवनाचे कोणते मानू खरे?
कोण तो? त्याच्या नि माझ्या वेगळ्या होत्या दिशा,
पाडली त्याच्या स्मृतींनी काळजाला का घरे?
मूळ आवृत्ती जशी होती तशी, कोरी, नवी!
वाचता आली कुणाला गूढ त्याची अक्षरे?
लाकडे ओली असो की चंदनी राहो चिता,
शेवटी या चौथर्यावर फक्त उरते राख रे!
Wednesday, October 6, 2010
वेगळ्या रूपात
पाकळीला जाण नको, देठालाही ताण नको
फूल असं अलगद टिपायचं
उणादुणा बोल नको, देताघेता मोल नको
नातं असं हळुवार जपायचं ॥
सांज जरा कलताना, जाईजुई फुलताना
रूप मनदर्पणात पहायचं
धुंद पश्चिमेची लाली, उतरता गोर्या गाली
नाजूकसं गीत एक लिहायचं ॥
पापणीला आच नको, डोळ्यांनाही जाच नको
स्वप्न असं नकळत बघायचं
मनात काहूर नको, आसवांचा पूर नको
पाऊल न वाजवता निघायचं ॥
चंद्रज्योती मालवता, नव्या आशा पालवता
ओंजळीत दंव गोळा करायचं
आठवणींची रांगोळी, कवितेच्या चार ओळी
वेगळ्या रूपात मागे उरायचं!
फूल असं अलगद टिपायचं
उणादुणा बोल नको, देताघेता मोल नको
नातं असं हळुवार जपायचं ॥
सांज जरा कलताना, जाईजुई फुलताना
रूप मनदर्पणात पहायचं
धुंद पश्चिमेची लाली, उतरता गोर्या गाली
नाजूकसं गीत एक लिहायचं ॥
पापणीला आच नको, डोळ्यांनाही जाच नको
स्वप्न असं नकळत बघायचं
मनात काहूर नको, आसवांचा पूर नको
पाऊल न वाजवता निघायचं ॥
चंद्रज्योती मालवता, नव्या आशा पालवता
ओंजळीत दंव गोळा करायचं
आठवणींची रांगोळी, कवितेच्या चार ओळी
वेगळ्या रूपात मागे उरायचं!
Subscribe to:
Posts (Atom)