Tuesday, June 2, 2009

अबोली

त्या आगळ्या सुरांनी भारावले कितीदा
चाहूल घेउनी ती मी धावले कितीदा

वाटे कधीतरी तू येशील या दिशेला
या मूक आसवांनी बोलावले कितीदा

तोडून बांध सारे, त्या गूढ़ अंतराळी
हे पाखरू मनाचे झेपावले कितीदा

पाऊल वाजता या वाटेवरी कुणाचे,
भासे तुझीच छाया, आसावले कितीदा

ते बोल आठवूनी स्वप्नात जागले मी
सत्यात त्या स्म्रृतींनी नादावले कितीदा

काही न बोलता ये, क्षण एक मी अबोली,
येताच तू समोरी भांबावले कितीदा

No comments:

Post a Comment