Wednesday, April 13, 2011

पंचम


गीतकार आणि कवी गुलज़ारजी यांनी त्यांचा परममित्र पंचम म्हणजेच आर. डी. बर्मन यांच्या आकस्मिक निधनानंतर लिहिलेली  पंचम ही अतिशय भावपूर्ण कविता. या कवितेचा स्वैर भावानुवाद करण्याचा हा माझा प्रयत्न.

आठवतात पंचम ते कुंद पावसाळी दिवस?
ओलसर वातावरणात डोंगराखालून, बोगद्यामधून
धुक्याच्या पडद्यातून गूढ अनंताकडे जाणारे
रेल्वेचे रूळ?

बसलो होतो दोघं त्या धुक्यात,
जशी दोन कुजबुजती झुडुपं, शेजारीशेजारी उगवलेली.
कितीतरी वेळ बसलो होतो
आदल्या रात्रीच येणार्‍या
त्या अनाहुत पाहुण्याची चर्चा करत.
कोण होता, कसा होता, कशासाठी येणार होता?
आला तर नाहीच, येण्याची वेळही टळून गेलेली.
तरीही आपण बसलो होतो कितीतरी वेळ
त्या रुळावर, दाट धुक्यात, चुकल्या क्षणाची,
त्याची, त्याच्या गाडीची वाट पहात,
न गाडी आली, न तो आला.
तू उठलास पाय मोकळे करायला,
धुक्यावर पावलं उमटवत निघूनही गेलास,
कुठंतरी अज्ञातात.

पंचम, मी एकटाच बसलो आहे रे धुक्यात, अजूनही
तुम्हा दोघांची वाट पहात, एकाकी!

आणि ही मूळ कविता.

पंचम

याद हैं बारिशों का दिन पंचम
जब पहाड़ी के नीचे वादी में,
धुंद से झाँक कर निकलती हुई,
रेल की पटरियां गुजरती थी..!

धुंद में ऐसे लग रहे थे हम,
जैसे दो पौधे पास बैठे हो..
हम बहुत देर तक वहाँ बैठे,
उस मुसाफ़िर का जिक्र करते रहे,
जिसको आना था पिछली शब, लेकिन
उसकी आमद का वक़्त टलता रहा!

देर तक पटरियों पे बैठे हुए
ट्रेन का इंतज़ार करतें रहे
ट्रेन आयी, न उसका वक़्त हुआ,
और तुम यूं ही दो कदम चल कर
धुंद पर पाँव रख के चल भी दिए

मैं अकेला हूँ धुंद में पंचम!!


- गुलज़ार

1 comment: